Saturday 2 June 2012

चाभरा चाटू संजय राऊत


शिवसेनेने महाराष्ट्रात जो काही बौद्धिक चाभरेपणा चालविला आहे, त्यामागे दोन कार्यकारी आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष दादू ठाकरे आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत. कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अपमानित करण्याचे पाप या चाभरेपणाचा एक भाग आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख ६ जून असताना. शनिवारी २ तारखेलाच रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याचे पाप या चाभ-या पिलावळीने केले. छत्रपतींचा इतिहास पुसून टाकून ठाक-यांचा इतिहास रूढ करण्याच्या पापी हेतूने हे सगळे खेळ केले जात आहेत. 

तशीही शिवसेनेची स्थापना शिवरायांची बदनामी करण्याच्या छुप्या हेतूने झालेली होती. महाराजांची बदनामी करण्याची एकही शिवसेनेने गेल्या चार दशकांत सोडलेली नाही. जेम्स लेन प्रकरण घडविण्यामागे सेनेच्या इशा-यावर काम करणारी पिलावळ होती, हे आता लपून राहिलेले नाही. सेनेने या संपूर्ण प्रकरणात गप्प राहून महाराजांच्या बदनामीचा आनंद लुटला. संजय राऊत यांचे वर्णन तर नुसते +चाभरा+ या विशेषणाने पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्यासाठी +चाभरा चाटू+ हे विस्तारित विशेषण अधिक उपयोगी ठरेल. 
दै. सामनामधून  वायफळ आग ओकण्याचे काम सातत्याने करणा-या चाटूसाहेबांची लेखणी लेन प्रकरणात लुळी पांगळी का झाली होती? आज थोरले ठाकरे विकल झाले आहेत, परंतु लेन प्रकरणाच्या काळात चाटूसाहेबांची लेखनी थोरल्या ठाक-यांपेक्षाही जास्त विकल झालेली होती. चाटूसाहेब, आपल्या लेखनीला तेव्हा अचानक असे घुर्रे का बरे आले? आज छत्रपती शिवाजी महाराज हयात असते, तर त्यांनी आधी या +चाभ-या चाटू+ला टकमक कड्यावरून फेकले असते. त्यानंतर ठाक-यांचाही बंदोबस्त केला असता. 


दोन शिवजयंत्या दोन राज्याभिषेक सोहळे घडविण्याच्या पापामागील कुजका मेंदू याच +चाभ-या चाटू+चा आहे. शिवसेनेचे कार्यकारी सध्या चाटूसाहेबांच्याच सल्ल्याने कारभार हाकत आहेत. शिवजयंती आणि शिवराज्याभिषेक सोहळा तारखेऐवजी तिथीनुसार साजरा व्हावा, असा  युक्तीवाद चाटूसाहेब सामनामधून सातत्याने करीत आहेत. पण सर्व ठाक-यांचे वाढदिवस हा तारखेनुसार साजरे होतात. खूद्द +चाभ-या चाटू+चा वाढदिवसही तारखेनुसारच साजरा होतो. मग महाराजांची जयंती आणि राज्याभिषेक सोहळा तिथीनुसार का हवा. याचे उत्तर चाटूसाहेबांकडे आहे का?

बाळ ठाकरे यांनी चार दशकांपेक्षाही जास्त काळ महाराष्ट्रात दादागिरी केली. ती केवळ मराठ्यांच्या बळावर. थोरल्या ठाक-यांना या उपकारांची जाणही होती. दोन्ही चाभरे कार्यकारी मात्र हे उपकार विसरले आहेत. राज्यकरत्यानी जनतेचे उपकार विसरायचे नसतात. कारण जनतेमुळेच राजकारण्यांना भाजी भाकरी मिळत असते. शेवटी शेतावर पाळलेले कुत्रेही खाल्ल्या भाकरीला जागते, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

अनिता पाटील 

No comments:

Post a Comment