Sunday 4 August 2013

आगरकर यांचा मराठा द्वेष

-राजा मइंद, संपादक मंडळ सदस्य, अपाविमं.   

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात त्या काळातील पुण्याचे आणि पुण्यातील माणसांचे त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह वर्णन आले आहे. पुण्याचा सामाजिक इतिहासच हे आत्मचरित्र सांगते. इतिहासांच्या पानावर मोठी असलेली अनेक माणसे प्रत्यक्षात कशी जातीय डबक्यातली बेडकं होती, हे महर्षि शिंदे यांच्या आत्मचरित्रातील निर्मळ वर्णनातून कळते. यापैकीच एक पात्र आहे गोपाळ गणेश आगरकर. महान समाजसुधारक म्हणून आगरकरांचे त्यांच्या हयातीतच नाव झाले होते. पण प्रत्यक्षात जीवनात ते कट्टर चित्पावन ब्राह्मण होते. मराठा समाजाविषयी त्यांच्या मनात द्वेष ठासून भरलेला होता. 

महर्षि शिंदे हे १८९३ ते १९९८ या ६ वर्षांच्या काळात पुण्यात फग्र्युसन कॉलेजात शिकायला होते. फर्ग्युसन कॉलेजची महिन्याची फीस १० रुपये होती. एका वेळी ३ महिन्यांची फी भरावी लागे. त्याकाळी पुण्यात डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन नावाची एक संस्था होती. ही संस्था मराठा समाज आणि इतर बहुजन समाजातील मुलांना शिक्षणासाठी मदत करीत असे. गंगाराम भाऊ म्हस्के आणि राजन्ना लिंगो यांनी मिळून ही संस्था काढली होती. श्री. म्हस्के साहेब संस्थेचे संस्थापक सेक्रेटरी होते. महर्षि शिंदे यांनी पुण्यात आल्या आल्या म्हस्के साहेबांची भेट घेतली. म्हस्के साहेबांनी त्यांना दरमहा १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यानंतर राहण्या-खाण्याच्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला. गरीब मुलांना नादारी देऊन फी माफ करण्याची योजना तेव्हा फर्ग्युसन कॉलेजात होती. नादारी देण्याचे अधिकार कॉलेजच्या प्राचार्यांना होते. फर्ग्युसनचे प्राचार्य वामन शिवराम आपटे (संस्कृत कोशकार) निवृत्त झाले होते. गोपाळ गणेश आगरकर हे नवे प्राचार्य म्हणून रुजू झाले होते. महर्षि शिंदे यांनी नादारीचा अर्ज घेऊन आगरकरांची भेट घेतली. "मला मराठा एज्युकेशन असोसिएशनची १० रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे.", असे महर्षि यांनी आगरकरांना प्रामाणिकपणे सांगून टाकले. झाले. ‘मराठा असोशिएशन'चे नाव ऐकताच आगरकरांच्या भुवया ताठ झाल्या. इतर एकही शब्द न ऐकता आगरकरांनी नादारी मिळणार नाही, असे सांगून टाकले. 

हा सगळा किस्सा महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्रात आला आहे. महर्षि यांनी भेट घेतली तेव्हा आगरकर हे पुण्यात राहत नसत. पुण्याबाहेर एका विस्तीर्ण जागेवर झोपडी बांधून ते राहत. याच झोपडीच्या जागेवर नंतर फर्ग्युसन कॉलेजच्या इमारती बांधण्यात आल्या. महर्षि हे १८९२ साली जमखंडी येथे काही काळ शिक्षक होते. तेथे आगरकरांची कथित कीर्ति महर्षि यांच्या कानावर गेली होती. महर्षि लिहितात : "इ.स. १८९२ साली मी जमखंडी शाळेत शिक्षक असताना त्यांचे सुधारक पत्रातले लेख माझ्या वाचण्यात येऊन माझी मते झपाट्याने सुधारणेच्या बाजूची बनत चालली होती. पण आगरकरांना प्रथम पाहिल्यावर त्या देखाव्याचा ह्या कल्पनेशी नीट मेळ जमेना." 

शिंदे-आगरकर भेट
महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे यांनी लिहिले : "माझ्या भेटीची वेळ सकाळी ९ वाजण्याच्या सुमाराची होती. दिवस हिवाळ्याचे होते. आगरकर कायमचेच देमकरी होते. ते झोपडीच्या बाहेर अंगणात उभे होते. लोकरीचा जवळ जवळ फाटलेला काळा मळकट कोट, चित्पावनी थाटाचे नेसलेले धोतर, लहानशा शेंडीचे थोडेसे विखुरलेले केस. पायात आगरकरी सुधारणेचा जोडा- म्हणजे ब्राह्मणी जोडाच; पण त्याचे टाचेवरचे कातडे टाचेच्या मागे वर उभे केलेले. मुद्रा बरीच त्रासलेली, भिवयांचे केस दाट व डोळे qकचित खोल व भेदक असे हे दर्शन घडले. माझा अर्ज पाहून मला डेक्कन मराठा असोसिएशनची स्कॉलरशीप मिळत आहे हे ऐकल्याबरोबर स्वारीने मला फी माफ व्हायची नाही हे निर्भिडपणे सांगितले. आधीच त्यांचा एकंदर पोषाख व मुद्रा पाहून, त्यांच्या सुधारकी कीर्तिमुळे मी जी भलतीच कल्पना करून घेतली होती ती ढासळली होती आणि त्यावर हा नकाराचा बॉम्ब मजवर आदळल्यामुळे आगरकरांविषयी माझा ग्रह अनुकूल झाला नाही. हा गृह कॉलेजच्या इतर प्रोफेसरांशी माझा पुढे जो अत्यल्प पत्यक्ष संबंध आला त्यामुळे म्हणण्यासारखा दुरुस्त झाला नाही.…. "

कॉलेजात असतानाही पक्षपातीपणाचा अनुभव महर्षि शिन्दे यांना वरचेवर येत गेला. पुढील वर्णनात शिन्दे यांनी लिहिले की : "… विशेष पेच हा की, त्या आगरकर महाशयांनी मला नादारी दिली नाही, त्यांच्या सुधारकातील लेख वाचून माझी त्या हरीवरील श्रद्धा बरीच कमी होत आली होती." 

हे सारे लिहित असताना महर्षि शिन्दे यांनी पिढीजात घरंदाजपणा आणि मनाचा मोठेपणा सोडला नाही. आगरकर आणि कॉलेज बद्दल ते अपशब्द वापरीत नाहीत. उलट आपल्याला आपल्या मनात जो काही कटु विचार आला त्याला आपला अजाणपणा कारणीभूत होता, असे म्हणून ते सारा दोष स्वत:कडेच घेतात. महर्षि लिहितात : "..खरोखर पाहता ह्याच आगरकरांचा इतर प्रोफेसरांचा qकवा कॉलेजच्या इतर परिस्थितीचा काहीच दोष नव्हता. केवळ ह्या निराशेला माझा अजाणपणा व अननुभवीपणा कारण होय." महर्षि शिन्दे यांच्या व्यक्तिमत्त्वातील ही संतवृत्ती खरोखरच अद्भूत होय. कुठे चित्पावनी ब्राह्मणवाद जोपासणारे आगरकर आणि कुठे या जातीयवादाला माफ करून दोष स्वत:च्या माथी घेणारे महर्षि विठ्ठल रामजी शिन्दे. 

महर्षि यांच्या मोठेपणास त्रिवार मानाचा मुजरा. 



No comments:

Post a Comment