Tuesday 16 September 2014

अपाविमंने पूर्ण केली ५ लाख वाचने!

सप्टेंबर २०१४ च्या उदयाबरोबर 'अनिता पाटील विचार मंच'ने ५ लाख वाचनांचा टप्पा ओलांडला. ५ लाख वाचने पूर्ण करणारा हा मराठीतील पहिला वैचारिक ब्लॉग ठरला आहे. अवघ्या ३ वर्षांच्या अवधीत ५ लाख वाचने पूर्ण करणाराही हा मराठीतल एकमेव ब्लॉग आहे. वाचकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणे आम्हाला शक्य झाले. आम्ही सन्माननीय वाचकांचे ऋणी आहोत. हे प्रेम असेच टिकून राहील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. 

गेली दोन वर्षे संपादक मंडळ ब्लॉगचे काम पाहत असला तरी ब्लॉगच्या यशाच्या खऱ्या शिल्पकार ब्लॉगच्या संस्थापिका आदरणीय अनिता ताई पाटील याच आहेत. महाराष्ट्राच्या मनात सलत असलेले प्रश्न अनिता ताई यांनी शोधून काढले. या प्रश्नांचा मूलगामी वेध घेऊन साध्या सोप्या शैलीत लेखन केले. ब्लॉगच्या तांत्रिक मांडणी आणि देखणेपणाकडेही तार्इंनी विशेष लक्ष दिले होते. अनिता ताई यांनी या ब्लॉगला दिलेल्या या आकारातच ब्लॉगचे यश सामावलेले आहे. 

अनिता ताई यांचा लेखनाचा झपाटाही मोठा. अवघ्या वर्षभराच्या काळात त्यांनी तब्बल १५० लेख ब्लॉगवर पोस्ट केले होते. हे सर्व लेखन तार्इंनी एकहाती केले होते. तसेच सर्व लेखांचे विषयही अत्यंत मूलभूत होते. तार्इंनी घालून दिलेल्या पायवाटेवरूनच संपादक मंडळ वाटचाल करीत आहे. ताई ब्लॉग लेखनापासून वेगळ्या झाल्या असल्या तरी, त्यांचे मार्गदर्शन संपादक मंडळाला नियमित लाभत आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात त्यांनी अनेक नवे विषय सूचविले, तसेच त्यांच्या मांडणीबाबतही मार्गदर्शन केले. संत जनाबाई यांच्या "घार हिंडते आकाशी । चित्त तिचे पिलापाशी ।।" या अभंग पंक्तीप्रमाणे त्यांचे बारीक लक्ष आहे, म्हणूनच संपादक मंडळ यशाच्या पायऱ्या चढू शकले. 

सन्याननीय वाचक आणि आदरणीय अनिता ताई पाटील यांचे ऋण व्यक्त करून हे निवेदन आम्ही येथेच संपवितो. 

-संपादक मंडळ, अनिता पाटील विचार मंच.

3 comments: