Monday 23 July 2012

लोकसत्ता आणि लोकप्रभेतील कावळ्याची पिले!


गेस्ट रायटर- समीर पाटील बोरखेडकर

इंद्रावन फळ घोळिले साकरा । भितरील थारा न संडीच ।
कावळ्याचे पिलू कौतुके पोशिले । न राहे उगले विष्ठेविण ।।
                                  -जगद्गुरू संत तुकाराम महाराज

एक्स्प्रेस ग्रुपच्या लोकसत्ता आणि लोकप्रभा या पत्रांतून सध्या बामनी जातीयवादाचा विखार ओकला जात आहे, त्याचे वर्णन करण्यासाठी तुकोबांच्या वरील ओळी अगदी यथार्थ आहेत. संतांना त्रास देणा-या लोकांचे वर्णन तुकोबांनी या ओळींतून केले आहे. ज्ञानेश्वरांपासून बहिणाबाईपर्यंत सर्व मराठी संतांना त्रास देणारी जमात एकच आहे. ती म्हणजे ब्राह्मण! संत-सज्जनांना त्रास देण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीला म्हणून ब्राह्मणवाद म्हटले जाते. लोकसत्ता हे दैनिक आणि लोकप्रभा हे साप्ताहिक सध्या महाराष्ट्रातील ब्राह्मणवादी विचारांचे मुख्य प्रचारकेंद्र ठरले आहे. एक्स्प्रेस ग्रुपचे मालक गोयंका यांनी ही पत्रे चालविण्याचे काम प्रारंभापासूनच बामनांच्या हाती सोपविले आहे. राजहंस म्हणून निवडलेले हे लोक मुळात कावळ्याच्या जातीचे आहेत, याची जाण गोयंका शेठ यांना नसावी. कावळ्यांच्या पिलांना कितीही कौतुकाने पोसले तरी शेवटी विष्ठा दिसली की, ती खाण्याचा मोह कावळ्यांना होतोच. तसेच बामनांचे आहे. समतेच्या विचारांचे कितीही डोस पाजले तरी तरी जातीयवादाची विष्ठेसाठी बामनांचे तोंड पाणी सोडतेच. लोकसत्तेतील बामनांचे तसेच झाले आहे. गोयंकासेठ यांनी कौतुकाने पोसलेले हे कावळे बहुजनांच्या श्रद्धास्थानांवर जातीय घाव घालू लागले आहेत. 

या दोन्ही पत्रांच्या बामनी जातीयवादाचे ताजे उदाहरण ‘वाचावे नेटके' या सदराने फार बटबटीतपणे पेश केले. अभिनवगुप्त या टोपण नावाने कोणी तरी इसम हे सदर चालवितो. या मानवाचे खरे नाव काय, हे त्याच्या नावाप्रमाणेच ‘गुप्त' आहे. त्याने अनिता पाटील आणि संजय सोनवणी यांच्या ब्लॉगविषयी लिहिलेला लेख गेल्या सोमवारी ९ जुलै रोजी लोकसत्तेच्या संपादकिय पानावर प्रसिद्ध झाला. अनिता ताई यांच्यावर या गुप्ताने एकच परिच्छे लिहिला असला तरी तो अत्यंत विखारी आहे. बामनांनी पोसलेली विषमता नष्ट करण्यासाठी अनिता ताई यांनी लेखनी हातात घेतली. त्यामुळे लोकसत्तेतील बामनांचे पित्त खवळले आहे. त्यातून त्यांनी अभिनवगुप्ताला पुढे करून अनिता ताई यांच्यावर हल्ला चढविला आहे. 

लोकसत्ता आणि लोकप्रभा यातील बामनी जातीयवादांची काही ठोस उदाहरणे आपण पाहू या. कुठल्याही क्षेत्रातील बामनी नाव दिसले की, ही पत्रे त्यांचा उदोउदो करायला सुरूवात करते. कविता महाजन आणि मेघना पेठे ही साहित्य क्षेत्रातील दोन नावे लोकसत्तेने अशीच उचलली. वस्तुत: या दोघीही जे काही लिहितात ते अत्यंत सुमार दर्जाचे असते. कविताबाइंचे ब्र आणि मेघनाबाइंचे नातिचरामि ही दोन पुस्तके काही वर्षांपूर्वी आली. ही पुस्तके प्रकाशकांच्या फडताळात पडून होती. मग एक दिवस या दोघींवर लोकसत्तेत पान-पान भर मजकूर प्रसिद्ध झाला. त्याबरोबर या दोघी लेखिका म्हणून मराठीत एस्टॅब्लिश झाल्या. एखाद्या बहुजन समाजातील लेखकासाठी लोकसत्तेने असे पानभर कधी लिहिले नाही. पानभर सोडाच, साधा टीचभर मजकूरही कधी छापला नाही. 

लोकप्रभेने तर दादोजी कोंडदेव आणि रामदास यांच्या वतीने सुपारीच घेतली आहे. दादोजी प्रकरणावरून वाद पेटला, तेव्हा लोकप्रभेतील बामनांनी बामन इतिहासकार शोधून शोधून बाहेर काढले. त्यांच्याकडून खोटे नाटे लेख लिहून घेतले. या लेखांना संजय सोनवणी सोनवणी यांनी सडेतोड उत्तरे दिली, तेव्हा त्यांना जरा आराम पडला. रामदासाचे जानवे मात्र अजूनही लोकप्रभा सोडायला तयार नाही. रामदासाला मानणारा वर्ग किती? महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या ०.२ टक्केही नाही. पण केवळ रामदास हा जातीने बामन होता, म्हणून त्याच्यावर एक विशेषांक लोकसत्तेने काढला. तुम्हाला एवढा पुळका आहे, तर काढा लेको, काय विशेषांक काढायचे तर. पण नीट तरी काढा. बहुजन महापुरुषांची त्यात बदनामी तरी करू नका. पण नाही. लोकप्रभेने रामदास विशेषांकात वारकरी संतांना कमी लेखले. प्रसिद्ध अभ्यासक सचिन परब यांच्यासारख्या अभ्यासकाला ही बाब खटकली. परब यांनी आपल्या ब्लॉगवर एक लेख त्याविरोधात लिहिला होता.
लोकप्रभेने ताजी बामनी काढी केली ती पंढरपूरच्या आषाढी यात्रा विशेषांकात. रामदासी पंथाचा आणि पंढरपूरचा काडीचाही संबंध नाही. चाफळ हे रामदासींचे मुख्यालय. सगळ्या महाराष्ट्रातील देवस्थानांवरून आषाढी कार्तिकीला पंढरपूरला पालख्या, दिंड्या येतात. चाफळ हे असे एकमेव देवस्थान आहे, जेथून पंढरपूरला दिंडी  येत नाही. पंढरपूरपासून रामदासी बामन फटकून राहतात. असे असले तरी लोकप्रभेने काढलेल्या पंढरपूर विशेषांकात चाफळच्या मठाधीशांचा लेख अग्रक्रमाने छापला. किती हा जातीयवाद?
..................................................................................................................
समीर पाटील बोरखेडकर यांच्या sarvsamaj |सर्वसमाज या ब्लॉगवरून साभार 

No comments:

Post a Comment