Monday 18 February 2013

मग काय, गाणे-बजावणे करणा-या श्रीकांत ठाक-यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारायचे?

--राजा मइंद


अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या शिवरायांच्या स्मारकास राज ठाकरे यांनी विरोध करून आपली जात दाखवून दिली आहे. अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारायचे नाही तर मग कोणाचे उभारायचे? श्रीकांत केशव ठाकरे यांचे?  स्मारके ही महापुरुषांची होत असतात. पेटी, तुणतुणे आणि सारंग्या वाजविणा-यांची नाही, एवढे साधे ज्ञान राज ठाकरे यांना दिसत नाही. श्रीकांत ठाकरे यांनी गाणे-बजावणे करण्याऐवजी समाज हिताचे काही महान कार्य केले असते, तर लोकांनी त्यांचेही स्मारक उभारले असते. 

ठाक-यांनी शिवाजी महाराजांची जेवढी बदनामी केली आहे. तेवढी बदनामी कोणीही केलेली नाही. ठाक-यांनी शिवाजी महाराजांचे नाव दंगलीसाठी वापरले. +जय भवानी जय शिवाजी+ म्हणायचे आणि दंगली घडवायच्या हे ठाक-यांचे धंदे आहेत. इतकेच नव्हे तर जेम्स लेनचे खरे मायबापही ठाकरेच आहेत. जेम्स लेनच्या पुस्तकावरून वाद सुरू झाला तेव्हा शिवसैनिकांनी पुण्यात श्रीकांत बहुलकर आणि इतर शिवद्रोह्यांच्या घरावर हल्ला केला होता. तेव्हा हेच राज ठाकरे बहुलकरांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागून आले होते. राज ठाकरे तेव्हा शिवसेनेत होते. सगळी शिवसेना तेव्हा शिवाजी महाराजांची बदनामी करणा-या लेन आणि त्याच्या पुण्यातील पाठिराख्यांच्या पाठीशी उभी राहिली होती. या पाश्र्वभूमीवर राज यांनी अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाला केलेला विरोध सुसंगतच आहे. ठाक-यांना शिवाजी महाराज फक्त मतदान मिळविण्यापुरते हवे आहेत.  शिवाजी महाराजांचे नाव घेतले की, मराठा तरुणांसह तमाम बहुजन समाज मागे येतो, म्हणून ते +जय भवानी जय शिवाजी+ म्हणत असतात. 

राज ठाकरे यांनी फक्त शिवरायांच्या स्मारकाला विरोध केलेला नाही. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज या सर्वच बहुजन महापुरुषांच्या स्मारकांना विरोध केला आहे. यावरून राज यांना केवळ ब्राह्मणांसाठी संघटना आणि सत्ता राबवायची आहे, हे स्पष्ट होते. अशा जातीयवादी माणसाच्या मागे धावायचे का, याचा फेरविचार बहुजन समाजातील तरुणांनी करायला हवा. 


या विषयाशी संबंधित इतर लेख :

No comments:

Post a Comment